*दिलासा सामाजिक संस्थेचा वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.!.*
दिलासा सामाजिक संस्थेचा वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.
केज
दिलासा सामाजिक संस्था ही गेली दशकापासून केज तालुक्यातील अती दुर्लक्षित घटकांवर विविध उपक्रम व. कार्यक्रमा च्या माध्यमातून लक्ष केंद्रीत करणे आणि समाज उद्धार व उच्चाटन करण्यासाठी चे काम करत आहे. ग्रामीण भागात महिला, मूल, शिक्षण, शेती, उपजीविका, कौशल्य विकास, आरोग्य, पर्यावरण आणि जल संधारण अशी कामे तसेच समुदाय जन जागृती च्या माध्यमातून सक्रिय काम करत असून ५ जून जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व संस्थेच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षा ज्योती ताई सांबरे, व कार्यकारी संचालक के. वाघमारे व व्ही. तांबोळी तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्व आणि नैसर्गिक संसाधनांचा समतोल राखणे साठी वृक्ष प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक यांना केज शहर परिसर हे ग्रीन सिटी करणे साठी आव्हान दिले तसेच परिसरातील सहभागींना संबोधित केले या व्यतिरिक्त तालुक्यातील चिंचोली माळी आणि पिंपरी या गावांमध्ये प्रत्येकी २०० वृक्ष रोपण करण्यात आले या कार्यक्रमात गावातील सक्रिय बचत गट, शेतकरी गट, शासकीय कार्यालयातील कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य इत्यादींनी सक्रिय सहभाग नोंदवला या उपक्रमात दिलासा सामाजिक संस्थेने कृषी विभाग, वन विभाग व पंचायत समिती सोबत समन्वय साधून अती उत्कृष्ट दर्जाची, पर्यावरण पूरक, प्रदूषण नियंत्रण करणारी आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती गुणधर्म असणारी वृक्ष गावांमध्ये लावण्यात आली या मध्ये अर्जुन, पिंपळ, कडू निंब, कदम, चिंच, वड इत्यादी चा समावेश आहे. सर्व प्रथम चिंचोली गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाड लावण्यात आली जेणे करून रुग्णांना स्वच्छ आणि आरोग्य दायी वातावरण आणि हवा मिळावी तसेच इतर दर्शनीय भागात वृक्ष लागवड करण्यात आली, या मध्ये सर्व सहभागींनी वृक्ष संगोपन आणि त्याची काळजी व जगविण्याची जबाबदारी घेतली. या कार्यक्रमाच्या यशस्विते साठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. तांबोळी, वाघमारे, कांबळे ताई यांनी परिश्रम घेतले तसेच संस्थेच्या एक मुख्य उद्देश पूर्ती चे काम यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली याच बरोबर चिंचोली सरपंच देशमुख ताई, डॉ अजियसिंग धाट, सोनवणे, आरोग्य सेवक गणेश, घोडके, पठाण तसेच ग्राम पंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा